MarathwadaPAITHAN

आयशर ट्रकने पीकअपला मागून ठोकले, महिला ठार, एक महिला गंभीर

औरंगाबाद/पैठण (शिवनाथ दौंड) – भरधाव आयशर ट्रकने पीकअप गाडीला मागून जोराची धडक दिल्याने, धुळे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गांवर झालेल्या अपघातात गयाबाई नरहरी लाड (वय ६५), राहणार बजाजनगर औरंगाबाद यांचा जागीच मृत्यू झाला तर गीता विष्णू लाड (वय ३५) राहणार औरंगाबाद या ह्या गंभीर जखमी झाल्याची घटना काल, सोमवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास धुळे-सोलापूर महामार्गवर गांधेली शिवारात घडली.

सविस्तर असे, की औरंगाबादकडून सोलापूरकडे जाणार्‍या पीकअप (क्रमांक एमएच २० ईएल ३०२३) या पीकअपचे टायर पंक्चर झाले असता, यातील वाहन चालक हा रोडवर टायर बदलत असताना, भरधाव आलेल्या आयशर (क्रमांक एमएच १८ बीजी ७०१५)या आयशर चालकाने समोर उभा असलेल्या पीकअपला मागून जोराची धडक दिली. त्यामुळे पीकअप पलटी होऊन कॅबिनमध्ये बसलेल्या महिलांना जबर दुखापत झाली. यात गयाबाई लाड या जागीच ठार झाल्या, व गीताबाई लाड या गंभीर जखमी झाल्या. जखमींना महामार्ग पोलीस यांच्या गाडीने औरंगाबाद शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस निरीक्षक प्रसाद जाधव, उपनिरीक्षक काकासाहेब नागवे, सहाय्यक उपनिरीक्षक राजू गोर्डे, पोलीस नाईक सुनील काकड यांनी घटनास्थळी जाऊन जखमी महिलेस पोलिसांच्या सरकारी वाहनाने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवले व रस्त्यावरील वाहने बाजूला करून वाहतूक सुरुळीत केली.
—————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!