Crime

चिखलीतून ३० वर्षीय विवाहिता बेपत्ता झाल्याने खळबळ

चिखली (तालुका प्रतिनिधी) – शहरातील संभाजीनगर परिसरातील ३० वर्षीय विवाहिता बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ती रागाच्या भरात घरातून निघून गेल्याची माहिती कुटुंबीयांकडून मिळत आहे. याबाबत चिखली पोलिस ठाण्यात मिसिंग दाखल झालेली आहे.

सविस्तर असे, की संभाजीनगर चिखली येथून तीस वर्षीय विवाहित महिला सौ. कांचन भालेराव ही २६ एप्रिल रोजी सकाळी साडेसहा वाजता कोणालाही काहीही न सांगता रागाच्या भरात घराबाहेर निघून गेली आहे. तरी यांचा शोध घेण्याकामी चिखली पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा शोध चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संतोष शेळके हे करीत असल्याची माहिती २७ एप्रिलरोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. तथापि, या विवाहितेचा शोध न लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!