चिखली (विशेष प्रतिनिधी) – राजमाता जिजाऊ मॉसाहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, युगाचार्य स्वामी विवेकानंद यांची जयंती इसरूळ ग्रामपंचायत येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त महापुरुषांच्या जीवन कार्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला.
इसरूळ ग्रामपंचायत येथे झालेल्या कार्यक्रमप्रसंगी सरपंच सतिश पाटील भुतेकर यांनी पुष्पहार अर्पण करून वंदन केले. याप्रसंगी उपसरपंच कलीम शेख व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. तसेच बचत गटाचे सदस्य व ग्रामस्थांचीसुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती होती.