Chikhali

प्रेमविवाह केला म्हणून सासुरवास; विवाहितेचा छळ, मारहाण

– विवाहिता गांगलगाव येथील, आरोपी धुळे जिल्ह्यातील देवपूरचे!
– म्हणे, आमच्या पोराला प्रेमप्रकरणात फसवून लग्न केले, माहेरून ५ लाख आण!
मेरा बु. ता. चिखली (ब्रेकिंग महाराष्ट्र) – पतीने घरच्यांच्या विरोधात जाऊन आपल्याशी प्रेमविवाह केला. तर तूच आमच्या मुलाला प्रेमप्रकरणात फसवून लग्न केले. त्यामुळे आता मानसिक त्रास, छळ व मारहाण करत, माहेरवरून पाच लाख रुपये घेवून ये, यासाठी अतोनात त्रास दिला जात आहे. जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे, अशी तक्रार २१ वर्षीय विवाहितेने अंढेरा पोलिस ठाण्यात दाखल केली होती. या तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी पती, सासू-सासरे, नणंद यांच्यासह पाच आरोपींविरोधात आज (दि.२२) रोजी गुन्हे दाखल केले आहेत. ही घटना गांगलगाव येथे घडली असून, पोलिस आरोपी अटक करण्याच्या तयारीत आहेत.
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या गांगलगाव येथील रहिवासी असलेल्या सौ. कोमल खुशाल वारुडे (वय २१) या विवाहितेने दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले की, माझा प्रेमविवाह देवपूर जिल्हा धुळे येथील खुशाल दिलीप वारुडे (वय ३१) यांच्या सोबत झाला होता. मात्र हा प्रेमविवाह पतीच्या आई, वडील व नणंद यांच्या मनाविरुद्ध झाल्यामुळे सासरच्या मंडळींनी जाणूनबुजून त्रास देण्याचा उद्देशाने विवाहितेस म्हटले की, तू आमच्या मुलाला प्रेमप्रकरणात फसवून लग्न केले, लग्नामध्ये कमी हुंडा दिला म्हणून तुझ्या वडिलांकडून पाच लाख रूपये घेवून ये, असे म्हणून तिला मानसिक छळ, त्रास देवून तिचा कौटुंबीक छळ करीत, चापटबुक्याने मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. अशा विवाहितेच्या तक्रारीवरून ठाणेदार गणेश हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अमलदार पोफळे, सिरसाट यांनी आरोपी पती खुशाल दिलीप वारुडे (वय ३१), सासरे दिलीप धुडकु वारुडे (६०), सासू सौ मनिषा दिलीप वारुडे (५१), नणंद सौ. सीमा अरविंद बोरसे (३६), सौ. लतिका दीपक साळुंके (३३) सर्व राहणार देवपूर, जिल्हा धुळे यांच्याविरोधात भारतीय दंडविधानाच्या कलम ४९८ ( अ ), ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस लवकरच आरोपींना अटक करून न्यायालयापुढे हजर करणार आहेत.
————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!