Breaking newsHead linesMaharashtra

राज्यातील किती प्रकल्पांना खोके सरकारने स्थगिती दिली?

मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – वेदांता – फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने महाराष्ट्राचे अतोनात नुकसान तर झालेच. परंतु, राज्यात जे प्रकल्प सुरु आहेत, ते बंद पाडण्याचे कारस्थानही हे गद्दारांचे सरकार करत आहे. वेदांता – फॉक्सकॉन प्रकल्प गेल्यावरून राज्य सरकारकडून कोणतेही उत्तर आलेले नाही, बल्कड्रग पार्कही राज्याचा बाहेर गेला, त्यावरही उत्तर नाही. मुख्यमंत्री दिल्लीत स्वत:साठी गेले की महाराष्ट्रासाठी, शिंदेची दिल्लीवारी आठवी आहे आणि २ वार्‍या लपून छपूनसह १२ वी वारी. राज्यातील किती प्रकल्पांना खोके सरकारने स्थिगिती दिली? हे पाहणे हादेखील एक सवाल आहे. वर्सोवा ब्रांदा सी लिंक हेदेखील काम बंद पाडले गेले आहे, असा आरोपही शिवसेना नेते आ. आदित्य ठाकरे यांनी केला.

आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद लाईव्ह!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!