CinemaPachhim Maharashtra

विलास पंडित मेहकरीकर रंगवणार खलनायक; तर गौरी सावंत मुख्य अभिनेत्री!

– नगरच्या मातीतून येणार आणखी एक जबरदस्त मराठी चित्रपट!

नगर (पांडुरंग गोरे) – अहमदनगर जिल्ह्याच्या काळ्या कसदार मातीतला आणखी एक मराठी चित्रपट येत्या १५ ऑगस्टपासून चित्रिकरणास सज्ज होत आहे. दबंगगिरी – एक बेधडक खाकी, असे या चित्रपटाचे नाव असून, त्याद्वारे जिल्ह्यातील मेहकरी येथील सिनेअभिनेता विलास पंडित यांचे या चित्रपटात खलनायक म्हणून जोरदार आगमन होणार आहे. तसेच, गौरी सावंत ही मुख्य अभिनेत्री आहे. देशभक्ती, रोमान्स आणि मारधाड दृश्ये असा सर्वानुभूती चित्रपट मसाला तर या चित्रपटात आहेच, पण गितेही कर्णमधूर असून, लोकप्रिय होण्याच्या वाटेवर आहे.

या मराठी चित्रपटांमध्ये विलास पंडित यांची खतरनाक आणि काळजाचा थरकाप करणारी खलनायकी एंट्री असून, चित्रपट देशभक्तीवर आधारित आहे. या निवडीचे मेहकरी गांव व तिसगाव, नगर, पुणे, औरंगाबाद आणि परळी येथे त्यांचे अभिनंदन होत आहे. या निवडीचे पत्र नुकतेच प्रोडूसर दिग्दर्शक सुदाम संसारे, वंदना गव्हाणे यांनी त्यांना दिले आहे, त्यांची या चित्रपटांमध्ये मुख्य खलनायक म्हणून घोषणा दिग्दर्शक, निर्माते पांडुरंग गोरे यांनी केली आहे.

या मराठी चित्रपटांमध्ये विलास पंडित मेहकरीकर हे खूप उत्साहित झाले असून, ते लवकरच या चित्रपटांमध्ये आपल्याला दिसणार आहे. पुण्याची सिनेअभिनेत्री गौरी सावंत ही अभिनेत्री प्रमुख नायिकेच्या भूमिकेत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक पांडुरंग गोरे हे ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे विशेष प्रतिनिधी असून, जितेंद्र चित्ते हेदेखील त्यांना दिग्दर्शक म्हणून सोबतीला आहेत. या चित्रपटाची पटकथा व गिते पांडुरंग गोरे यांनी स्वतः लिहिली आहे. मराठी व हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधून जवळपास पन्नास कलाकार या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!