बुलढाणा (खास प्रतिनिधी) – खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याप्रकरणी राज्यभर काँग्रेसकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. बुलढाणा जिल्ह्यात देखील पडसाद उमटत आहेत. काँग्रेस नेत्या जयश्रीताई शेळके यांनी देखील मोदी सरकारवर टीका केली.
‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना त्या म्हणाल्या की, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यामागे मोदी सरकारचे षडयंत्र आहे. राहुल गांधी यांचा संसदेतील आवाज सूडबुद्धीने म्युट करण्यात आला. एक प्रकारे ही लोकशाहीची गळचेपी केली. त्यांनी सांगितले की काँग्रेस अशा प्रकारांना घाबरणार नाही.”राह मे खतरे बहुत है लेकीन ठहरता कोन है! मौत कल आ जाये डरता कौन है!तेरे लष्कर के मुकाबिल मै अकेला हु मगर..फैसला मैदान मे होगा की मारता कौन है!