ChikhaliVidharbha

सैलानीबाबा दर्गा परिसराने घेतला मोकळा श्वास!

– इंग्रजकाळातील पोलिस अधिकार्‍यांनाही जे जमले नाही ते एपीआय राजपूत यांनी करून दाखवले!

चिखली (महेंद्र हिवाळे) – गेली अनेक शेतके पोलिस अधिकार्‍यांना जे काम जमले नाही, ते काम कायद्याचा धाक दाखवून नाही तर गांधीगिरीने रायपूरचे ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी करून दाखवले आहे. जगप्रसिद्ध सैलानीबाबा दर्गा येथे जाणार्‍या निमुळत्या मार्गावरील सर्व अतिक्रमणे दूर करण्यात आली असून, सैलानी गावात कायदा व सुव्यवस्था कठोर करण्यात आली आहे. त्यामुळे मागीलवर्षी प्रमाणे याहीवर्षी सैलानीबाबा यात्रा निर्विघ्न व आनंदात पार पडणार असल्याचे संकेत प्राप्त झालेले आहेत.

सैलानीबाबा दर्गा, पिंपळगाव सराई रायपूर येथे जगप्रसिद्ध असलेले सैलानीबाबा यांची दर्गा असून, सदर दर्गा दर्शनासाठी नेहमी हजारो भाविक हे येत असतात. बाबाचे दर्शनासाठी विशेष करून सर्व धर्मातील लोक हे मोठ्या भक्तीभावाने येथे येतात. या ठिकाणी खर्‍याअर्थाने जाती-धर्म विरहित भाविक व माणसे पाहायला मिळतात. इतर पोलीस स्टेशनपेक्षा रायपूर सैलानी येथे नोकरी करणे म्हणंजे एक दिव्यच आहे. कारण ज्यासाठी रायपूर पोलिस ठाण्याची निर्मिती झाली ते म्हणजे सैलानीबाबा दर्गा. या दर्गा येथे दरवर्षी मार्च महिन्यात होळीचे वेळेस जवळपास १५ दिवसांची मोठ्या प्रमाणात यात्रा भरत असते व त्यात राज्य परराज्यातून भाविक हे लाखोचे संख्येने येत असतात. तसेच दैनंदिन हजारो लोक येथे दर्शनासाठी येत असतात. अशामुळे येथे नेहमी अस्वच्छता, घाणीचे साम्राज्य पाहायला मिळते. तसेच गुन्हेगार याचा गैरफायदा आश्रय घेण्यासाठी येत असतात. तसेच दर्गा ट्रस्ट व मूळ मुजावर जमीन मालक यांचा सुरू असलेला न्यायालयीन वाद व त्यातून सदर ठिकाणी कोणतेही काम करण्यास प्रशासनास येणार्‍या अडचणी. या सर्व परिस्थितीत पोलिसांना सैलानी येथे काम करायचे असते. त्यामुळे येथे नेमणूक झाल्यावर सैलानी येथे आल्यावर बरेच अधिकारी हे निराश होत असतात. परंतु यामध्ये ठाणेदार म्हणून या ठिकाणी गेल्या सहा महिन्यापासून येथे कामकाज करीत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक दुर्गेश राजपूत हे आपल्या कामाने वेगळे ठरलेले आहेत. ठाणेदार राजपूत यांनी सूत्रे हातात घेतल्यापासून सर्वात जास्त सैलानीबाबा दर्गा येथे लक्ष केंद्रित केले व त्या ठिकाणी काय काय करता येईल, यासाठी कामकाज सुरू केलें व लोकांना मार्गदर्शन करून स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. येथेच त्यांनी सर्वांची मने जिंकली. यानंतर त्यांनी सुरक्षेचे दृष्टीने परिसरातील गुंड, गुन्हेगार, भोंदू बाबा, मोबाईल चोर, पाकीटमार यांचा चोख बंदोबस्त केला. सैलानी दर्गा येथे अजून एक मुख्य अडचण होती ती म्हणंजे दर्गाकडे जाताना असलेले दुकानदारी अतिक्रमण व इतर फॉरेस्ट अतिक्रमण. ठाणेदार राजपूत यांनी फॉरेस्ट विभाग यांची मदत घेऊन मागील महिन्यात फॉरेस्ट जमिनीवरील अतिक्रमणदेखील हटावले. परंतु या मध्ये सर्वात महत्वाचे होते दर्गाकडे जात असताना फुल, चादर, लोभान आदी विक्रेते दुकानदार यांचे अतिक्रमण व त्यामधून दर्गापर्यंत पोहचण्यासाठी तयार झालेला निमुळता व अरुंद रस्ता. याबाबत ठाणेदार दुर्गेश राजपूत यांना सदर रस्ता हा निमुळता असल्याने व भाविकांना येण्या-जाण्यासाठी होणारी अडचण नेहमी खटकत होती, परंतु सदर बाबत कोणालाही विचारणा केली असता साहेब ते शक्य होणार नाही. मुजावर, दुकानदार लोक ऐकनार नाहीत. आजपर्यंत कोणतेही ठाणेदार यांनी हा रस्ता मोकळा केला नाही, प्रॉब्लेम, वाद होतील, अशा प्रकारची माहिती त्यांना वारंवार मिळत होती. परंतु ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी लोकांशी प्रेमाने संवाद साधण्याची कला व तगडा अनुभव याचे जोरावर त्यांनी सैलानी दर्गा बद्दल व येथील लोकांबद्दल असलेली मानसिकता बदलून टाकावी या हेतूने त्यांनी सर्व दुकानदार यांच्याशी संवाद साधून सर्व दुकाने पाठीमागे नेण्यास व रस्ता मोकळा करण्याबाबत समजावून सांगण्यास सुरुवात केली. पहिल्या प्रयत्नात पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही, परंतु विरोध ही झाला नाही. त्यातून राजपूत यांनी प्रेमळ संवाद साधून येता जाता प्रत्येक भेटीमध्ये दुकानदार यांना बोलावून समजवून सांगणे. फायदे तोटे, मदत, भाविक सुरक्षा या बाबी वारंवार सांगून व त्यांची सांगण्याची तळमळ पाहून दुकानदार, मुजावर लोकांना पाझर फोडण्यात अखेर ठाणेदार यशस्वी झाले व जे मागील एका संपूर्ण शतकात कोणी अधिकारी करू शकले नाही, ते काम ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी करून दाखवले व तेदेखील कोणत्याही कायद्याचा धाक दाखवून नव्हे तर प्रेमाने व मधुर संवाद साधून, त्यांनी सर्व दुकानदार मुजावर लोक यांची मने जिंकली व सर्व दुकानदार यांनी स्वतः हून त्यांची दुकाने जवळपास १५ फूट मागे घेतली व रस्ता मोकळा केला, व अखेर सैलांनीबाबांनी मोकळा श्वास घेतला असे म्हणण्यास हरकत नाहीं.
ठाणेदार राजपूत हे येथेच न थांबता त्यांनी आजरोजी सर्व दुकानदार यांनी प्रशासनास मोठ्या मनाने सहकार्य केले म्हणून ठाणेदार राजपूत यांनी दर्गा परिसर येथे कार्यक्रम घेऊन स्वहस्ते संबंधित दुकानदाराचा सत्कार देखील बाबांचे चरणी करून दिला. या गांधीगिरीमुळे दुकानदारसुद्धा भारावून गेले, व दुकानदार यांनीसुद्धा ठाणेदार दुर्गेश राजपूत यांचा अशा विशेष कार्याचा यथोचित सन्मान करून त्यांचा सत्कार केला व यापुढे प्रशासनाला नेहमी सहकार्य करू, असे आश्वासन दिले.


ठाणेदार राजपूत यांनी सैलानीमध्ये विविध विषयांवर काम चालू केले असून त्यात संपूर्ण स्वच्छता, कारवा चौक येथे रस्त्यावर वाहने उभे राहू नये या करिता पे अँड पार्क पार्किंग, सुरक्षा म्हणून संपूर्ण पोलीस यंत्रने मार्फत सीसीटीव्ही कॅमेरे. लॉज भाडेकरू रेकॉर्ड ठेवणे अशा प्रकारची कामे चालू केलेली आहेत. तसेच काही महिन्यांवर येऊन ठेवलेल्या यात्रेचे आतापासूनच त्यांनी नियोजन करने सुरू केले असल्याचे त्यांचे कामावरून दिसून येत आहे. सदर विशेष कामाची संकल्पना ही अधीक्षक सुनील कडासने, अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्री महामुनी, उपविभागीय पोलिस अधिकारी गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनखाली राबविण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!