AalandiPachhim Maharashtra

माऊली मंदिरात रक्षाबंधनदिनी मुक्ताईची ज्ञानदेवांना राखी अर्पण

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात रक्षाबंधन दिनी श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथून मुक्ताई संस्थान, कोथळी आणि श्री क्षेत्र मेहून येथून श्री आदिशक्ती मुक्ताबाई संस्थानच्या वतीने पाठविलेली राखी श्रींचे समाधीला स्पर्श करीत अर्पण करण्यात आल्या. माऊली मंदिरात श्रीनां राखी अर्पण करण्यात आली. यावेळी दर्शनास भाविकांनी मंदिरात तसेच महाद्वारात गर्दी केली. आळंदी मंदिर परिसरात भाविकांसह भाविक व पंचक्रोशीतील वाहनाची प्रचंड गर्दी होती.

आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी रक्षाबंधन दिनी आलेल्या सन्माननीय राख्याची माहिती दिली. मुक्ताईची श्रींसाठीची राखी ह.भ.प. विचारसागर महाराज लाहुडकर यांचे प्रमुख उपस्थितीत देवस्थानच्या परंपरागत नियोजन प्रमाणे श्रीनां अर्पण करण्यात आली. रक्षाबंधन दिनाची येथील परंपरा श्री आदिशक्ती मुक्ताबाई संस्थानच्या वतीने पाटील महाराज आणि सर्व संबंधित संस्थान यांनी श्रीनां राखी पाठवीत परंपरा कायम ठेवली. यावेळी आदिशक्ती मुक्ताई यांच्याकडून श्रीक्षेत्र आळंदी, त्र्यंबकेश्‍वर आणि सासवड येथे ही श्रीनां राखी अर्पण करण्यास पोच करण्यात आली. आळंदी देवस्थानचे वतीने श्री आदिशक्ती मुक्ताबाई संस्थानचा सन्मान विचारसागर महाराज पाटील लाहुडकर यांचा श्रीफळ प्रसाद भेट देऊन सत्कार करण्यात आला. आळंदीतील माऊली मंदिरासह परिसरातील घराघरांमध्ये रक्षाबंधन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुक्ताई संस्थान तर्फे पुरुषोत्तम वंजारी यांनी सपत्नीक श्रींची पुजा, अभिषेक करीत मुक्ताईची ज्ञानदा साठीची राखी समाधीस स्पर्श करीत अर्पण केली. व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, विचारसागर महाराज लाहूडकर, संदीप पालवे आदी उपस्थित होते. आळंदी संस्थान चे वतीने मुक्ताईस साडी चोळी सुपूर्द करण्यात आली.

येथील श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेत देखील आपल्या आई, वडील आणि बहीण , भाऊ तसेच कुटुंबीय यांचे पासून दूर राहून आळंदीत शालेय शिक्षणा सह अध्यात्मिक शिक्षण घेणास निवासी राहत असलेल्या मुलं, मुलींसाठी रक्षा बंधन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेत रक्षण बंधन निमित्त मुलांना राखी बांधून सण साजरा केला. यावेळी संस्थेचे वतीने सर्व मुलं-मुलींना सुग्रास स्नेहभोजन देण्यात आले. या प्रसंगी मोहन महाराज शिंदे, सचिन महाराज शिंदे, माऊलींचे मानकरी ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, आळंदी जनहित फाऊंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, युवा उद्योजक राहुल चव्हाण, कृष्णा महाराज कोलते आदी उपस्थित होते. परंपरांचे पालन करीत आळंदी पंचक्रोशीत रक्षा बंधन घराघरांत साजरे करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!