सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – पाच वर्षे पूर्ण झालेल्या जिल्हा परिषदेसह तालुक्यातील जवळपास २२ कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. परंतु सामान्य प्रशासन विभागामधील गेल्या पाच वर्षापासून तळ ठोकून राहिलेल्या अनिल जगताप यांना मुख्यालयातच ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
याबद्दल प्रामुख्याने दक्षिण सोलापूर तालुक्याचे ठिकाणी प्रशासन अधिकारी असलेले विवेक लिंगराज यांची बदली झेडपीच्या मुख्यालयातील कृषी विभागामध्ये झाली आहे. तर कृषी विभाग मुख्यालय येथील सुलगडले यांची बदली दक्षिण सोलापूर तालुक्याच्या ठिकाणी झाली आहे. याबरोबरच महिला बालकल्याण विभागातील गिरीष जाधव यांची बदली आरोग्य विभागामध्ये करण्यात आली आहे. तसेच उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये असलेले राजेश देशपांडे यांची बदली प्राथमिक शिक्षण विभागामध्ये झाली आहे. विशेष म्हणजे, सामान्य प्रशासन विभागामध्ये अनुभवी कर्मचार्यांची गरज आहे. परंतु उत्तर पंचायत समिती वरून नागेश धोत्रे यांची थेट सामान्य प्रशासन विभागामध्ये बदली करण्यात आली आहे. त्यामुळे अनुभवी कर्मचार्यांना डावलून नवख्या कर्मचार्यांना कर्मचार्यांची नियुक्ती केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अखेर लिंगराजनी गाठलेच मुख्यालय!
तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारूड यांनी महिला बालकल्याणमध्ये असलेले विवेक लिगंराज यांची बदली मागील पाच वर्षांपूर्वी दक्षिण सोलापूर पंचायत समिती येथे केली होती. त्यामुळे लिंगराज अस्वस्थ झाले होते, परंतु पाच वर्षे झाल्यानंतर पुन्हा लिंगराज यांनी कृषी विभागांमध्ये येऊन मुख्यालय गाठले.
—————