LONARMEHAKARVidharbha

विमुक्त जातीतील बोगस राजपूत-भामटा यांची अवैध घुसखोरी थांबवा; अन्यथा तुमचा सुपडासाफ करू!

नाम साधर्म्याचा गैरफायदा घेत अनेक जातींनी बोगस जातप्रमाणपत्रांआधारे आरक्षण लाटल्याचा गंभीर आरोप

बिबी (ऋषी दंदाले) – नुकतीच एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून, महाराष्ट्रातील विमुक्त जाती अ प्रवर्गात बोगस राजपूत भामटाने प्रचंड घुसखोरी केली आहे. विमुक्त जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांच्या तब्बल तिनशे पेक्षा अधिक जागा बोगस राजपूत भामटाने हडप केल्या आहेत. यासाठी गोरबंजारा समाजातील अग्रेसर असलेल्या गोरसेना या सामाजिक संघटनेच्यावतीने काल संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत शासनाला निवेदन देऊन ही घुसखोरी थांबविण्याची विनंती करण्यात आली असून, अन्यथा येणार्‍या निवडणूकीत विद्यमान सरकारचा सुपडासाफ करण्याचा गर्भीत इशारा गोरसेनेने दिला आहे.

विमुक्त जाती अ मध्ये राजपूत भामटा या अत्यल्प लोकसंख्या असलेल्या जातीचा सामावेश असून, नाम साधर्म्याचा फायदा घेत सवर्ण राजपूत, मिना, छप्परबंद या खुल्या प्रवर्गातील जनसमुदाय यांनी खुलेआम घुसखोरी करीत अभियांत्रिकी, वैद्यकीयसह शासकीय नोकरभरतीत लाभ घेत आहे. राजपूत जातीतील लोक भामटा शब्द लावून भामटेगिरी करत असल्याने मूळ विमुक्त जाती अ प्रवर्गातील १४ तत्सम जाती आरक्षणाचे अतोनात नुकसान होत आहे. म्हणून, गोरसेना या संघटनेतर्पेâ संपूर्ण महाराष्ट्रात २०१९ पासून ठिकठिकाणी आंदोलने होत आहे. यासंदर्भात न्याय हक्क व अधिकारांसाठी गोरसेनेने राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात निवेदने दिलीत, नंतर जिल्हा स्तरावर रास्ता रोको करण्यात आले होते. मोर्चा आंदोलने गोरसेनेनी केले. तेव्हा विधीमंडळात विशेष तपासणी आयोग एस.आय.टी. नेमण्याची घोषणा दलीत बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केली. मात्र राजकीय दबावाखाली येत त्यांनी दुसर्‍याच दिवशी माझ्याकडून चुकीची घोषणा झाल्याचे सांगत एस.आय.टी.लागू करणार नसल्याचे सांगितले.

तेव्हा गोरसेनेच्यावतीने नागपूर हिवाळी अधिवेशनावर नागपुरात ०८ डिसेंबर रोजी २५ -३० हजार लोकांच्या जनसमुदायाला घेऊन जनआक्रोश महामोर्चा काढण्यात आला. मात्र या मोर्चाचे साधे निवेदन घेण्यासाठीसुद्धा राज्य सरकारच्या एकही मंत्र्याने औचित्य दाखविले नाही. मंत्री अतुल सावे विधीमंडळातून पळ काढला अन् मोर्चेकरीच्या नेतृत्वाला सामोरे गेले नाही. साधे निवेदन न घेतल्याने समस्त गोरबंजारा समाजाचा जाणिवपूर्वक अपमान राज्यसरकारने केलेला आहे. कालपरवा दिनकर राठोड या गोरबंजारा युवकांने पुसद येथे १४ दिवस आमरण उपोषण केले, मात्र त्यांची राज्य सरकारने किंचितही दखल घेतली नाही की विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात साधी चर्चा सुद्धा केली नाही. त्यामुळे गोरबंजारा समाज प्रचंड संतापलेला असून, यावेळी बंजारा समाजाच्या मतावर निवडून गेलेल्या आमदारांनी समाजाचा या जीवंत प्रश्नाकडे जाणिवपूर्वक कानाडोळा केला.

बोगस राजपूत भामटा घुसखोरीच्या प्रश्नाबाबत साधे निवेदन न केलेल्या राज्य सरकारला धडा शिकवण्यासाठी गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण यांनी कंबर कसली असून, यावेळी ६२ विधानसभा आमदारांना घरचा रस्ता दाखवण्याचा गर्भित इशारा गोरसेनेने दिले आहे. या अगोदर संपूर्ण राज्यात १८ जिल्ह्यांत जोडे मारो आंदोलन केले होते. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात गोरसेनेने विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यामध्ये तुळजापूर, जालना, मंठा, पुसद, दिग्रस, दारव्हा, अकोला, वाशीम, हिंगोली, नांदेड, बीड, बुलढाणा आदी ठिकाणचा सामावेश होता. बोगस राजपूत भामटा यांच्या घुसखोरीविरोधात गोरसेनेने रणसिंग फुंकलेले असून, गोरसेनेचे आंदोलन हे जन आंदोलन होत आहे.

तांडा, वाड्यावरुन या आंदोलनाला जनतेचे मोठे पाठबळ लाभत आहे. विमुक्त जाति (अ) प्रवर्गात अवैध मार्गाने खोटे जातवैधता प्रमाणपत्र घेणार्‍या लाभार्थ्यांसह खोटे प्रमाणपत्र वितरित करणार्‍या अधिकार्‍यावर कार्यवाही करण्यासाठी विशेष तपासणी पथक (एसआयटी) लागू करण्यात यावी. (२) संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा ठिकाणी जिल्हा जात वैधता पडताळणी समितीमध्ये वि . जा. (अ) प्रर्वगातील एका तज्ञ व्यक्तीस शासकीय प्रतिनिधी म्हणून नेमणूक देण्यात यावी. (३) २४ नोव्हेंबर २०१७ च्या महाराष्ट्र शासनाकडून निर्गमित झालेला रक्त नातेसंबंधाचा निकष लावून जातवैधता प्रमाणपत्र देण्याचे शासन निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा. (४ ) संपूर्ण महाराष्ट्रात खरे राजपूत जातीचे लोक प्रत्यक्षात कुठे निवासी राहतात, त्या तालुकानिहाय जिल्ह्याची यादी शासनामार्फत त्वरित जाहीर करण्यात यावी. (५) राज्य मागास अहवाल क्र. ४९ / २०१४ लागु करण्यात यावा. (६) महाराष्ट्र शासनाने विमुक्त भटक्या जमातींना लागू केलेली उन्नत व प्रगत गटाची अट त्वरित रद्द करण्यात यावी. या मागण्या मान्य न झाल्यास येत्या निवडणुकीला संपूर्ण विमुक्त जाती अ प्रवर्गातील जातीचे विशेषतः बंजारा जातीमध्ये तीव्र संताप निर्माण होऊन भविष्यात राज्य सरकारला फार मोठी किमंत चुकवावी लागणार आशा प्रकारचे निवेदन लोणार तहसीलदारांना देण्यात आले.

यावेळी गोर सेना जिल्हा सचिव वितेश चव्हाण, तालुकाध्यक्ष भारत राठोड, तालुका सचिव पवन राठोड, राहुल जाधव, भगवान जाधव, दुर्गादास चव्हाण सह शेकडो गोर सैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!