BULDHANAChikhaliVidharbha

महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करा!

– रेखाताईंनी राज्यपालांना बांधली राखी!

उदयनगर, ता. चिखली (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्यात गेल्या वीस दिवसापासून पाऊस नसल्याने शेतकर्‍यांची पिके करपू लागली आहेत. विशेषत: विदर्भात शेतकरी आत्महत्येचा विषय गंभीर आहे. त्याचबरोबर विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशात पिण्याच्या पाण्याची समस्येमुळे स्थलांतराची परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे या परिस्थितीत कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षा सौ. रेखाताई खेडेकर यांनी आज, दि.३० ऑगस्ट रोजी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन केली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर उपस्थित होते. रेखाताई खेडेकर यांनी याप्रसंगी राज्यपाल रमेश बैस यांना राखी बांधली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!