ChikhaliHead linesVidharbha

चिखली तालुक्यातील उद्योजक अरूण अंभोरे यांची आत्महत्या

चिखली (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील उद्योजक अरूण नागोराव अंभोरे (वय ५०) यांनी दि. ५ एप्रिल रोजी सकाळी बुलढाणा येथील बालाजी मंदिरामागील राजूर घाटात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

चिखली तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील रहिवासी असलेले अरुण नागोराव अंभोरे हे छत्रपती संभाजीनगर येथे बांधकाम व्यावसायिक व  उद्योजक होते. त्यांनी ५ एप्रिल रोजी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. राजूर घाटातील बालाजी मंदिरालगत असलेल्या डोंगरात त्यांनी गळफास घेतला. अरुण अंभोरे यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. तथापि, त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिस अधिक तपास करत आहेत.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!