Breaking newsBuldanaBULDHANAHead linesMEHAKARVidharbha

आठ दिवसांत शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य करा, नाही तर ‘सळो की पळो’ करून सोडू!

– शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर तुपकर पुन्हा आक्रमक; मेहकरात धडकला हजारो शेतकर्‍यांचा आक्रोश मोर्चा!
– पीकविमा, सोयाबीन-कापसाचा भाव फरक, कर्जमुक्ती देण्याची शेतकर्‍यांची मागणी

मेहकर (तालुका प्रतिनिधी) – शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे आज हजारो शेतकर्‍यांचा आक्रोश मोर्चा निघाला. गेल्या वर्षीचा १०० टक्के पीकविमा व नुकसान भरपाई मिळावी, जंगली जनावरांपासून संरक्षणासाठी शेतीला कंपाऊंड मिळावे, वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीची दावे तातडीने निकाली काढावे, गेल्यावर्षीचा सोयाबीन-कापसाचा भाव फरक मिळावा, शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी व घरकूलाचे रखडलेले अनुदान तातडीने मिळावे, यासह इतर मागण्यांसाठी मेहकर तहसील कार्यालयावर शेतकर्‍यांचा आक्रोश बघायला मिळाला. यावेळी रविकांत तुपकरांनी आक्रमक भूमिका घेत, आठ दिवसांच्याआत शेतकर्‍यांच्या मागण्यांसंदर्भात ठोस निर्णय घ्या, अन्यथा राज्यव्यापी आक्रमक आंदोलन करून सरकारला सळो का पळो करून सोडू, असा इशारा तुपकरांनी राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारला दिला आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर तुपकर हे पुन्हा एकदा शेतकरीप्रश्नी आक्रमक झाल्याचे या मोर्चातून दिसून आले आहे.

पीकविमा, नुकसान भरपाई, कर्जमुक्ती व शेतकर्‍यांच्या इतर मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला असून, आज २९ जुलै रोजी तुपकरांच्या नेतृत्वाखाली मेहकरात शेतकर्‍यांचा विराट असा आक्रोश मोर्चा निघाला. प्रचंड घोषणाबाजी करत निघालेल्या या मोर्चाने मेहकर शहर दणाणून सोडले होते. आठ दिवसांच्याआत शेतकर्‍यांच्या खात्यात तातडीने पीकविमा, नुकसान भरपाईची रक्कम जमा न केल्यास राज्य सरकारला हादररुन सोडणारे राज्यव्यापी आंदोलन करु, असा इशारा रविकांत तुपकर यांनी मोर्चाला संबोधित करतांना दिला, शिवाय या आंदोलनाची सुरुवात मेहकरातून करु, असेही त्यांनी सांगितले. शेतकर्‍यांना गेल्यावर्षीचा १०० टक्के पीकविमा मिळावा, तसेच नुकसान भरपाई मिळावी, जंगली जनावरांपासून पिकांचे संरक्षण होण्यासाठी शेतीला कंपाऊंड मिळावे, वन्यप्राण्यांनी शेतापिकांच्या केलेल्या नुकसानीची दावे तातडीने निकाली काढून शेतकर्‍यांना भरीव नुकसान भरपाई मिळावी, गेल्यावर्षीचा सोयाबीन-कापसाचा भाव फरक तातडीने मिळावा, घरकुलाचे रखडलेले पैसे तात्काळ मिळावे, तातडीने शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी, यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडीचे राज्याचे प्रमुख नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात मेहकरात शेतकर्‍यांचा विराट आक्रोश मोर्चा निघाला. प्रचंड घोषणाबाजी करत निघालेल्या या मोर्चाने मेहकर शहर दणाणून सोडले होते. सरकार शेतकर्‍यांच्या मागण्या आणि समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. सत्ताधार्‍यांनी शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले आहे. शेतकर्‍यांच्या या मागण्यांसाठी आम्ही आजवर विविध आंदोलने केली आहेत. परंतु, सरकार निगरगठ्ठपणे वागत आहे, त्यामुळे आता आम्ही सरकारला निर्वाणीचा इशारा देत आहेत. सरकार जर शेतकर्‍यांचा विचारच करणार नसेल तर सरकारला जागे करण्यासाठी आता आक्रमक आंदोलन करण्याची वेळ आली आहे, सरकारने तातडीने शेतकर्‍यांच्या या मागण्यांसंदर्भात ठोस निर्णय घेतला नाही व आठ दिवसांचा आत शेतकर्‍यांच्या खात्यावर पीकविमा जमा करावा, अन्यथा राज्य सरकारला हादरुन सोडणारे राज्यव्यापी आंदोलन करु, असा इशारा रविकांत तुपकर यांनी मोर्चाला संबोधित करताना केला. शिवाय, या आंदोलनाची सुरुवात मेहकरातून करु, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी या मोर्चाला गजानन अमदाबादकर, डॉ.ज्ञानेश्वर टाले, डॉ.ऋतुजा चव्हाण, भैय्यासाहेब पाटील, गजानन कावरखे, सहदेव लाड यांनी संबोधित केले तर या मोर्चाला नामदेव पंतगे, ऋषांक चव्हाण, विनायक सरनाईक, प्रकाश गीते, गणेश गारोळे, वैभव आखाडे, जुबेर खान, भगवान पालवे, देवेंद्र आखाडे, गजानन चव्हाण, कैलास उतपुरे, विष्णू आखरे, प्रफुल्ल देशमुख, श्रीराम चलवाड, शिवाजी मेटांगळे, अरविंद दांदडे, कल्पना टाले यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
——

मेहकरात भरपावसातही सभा सुरूच…एकही शेतकरी हालला नाही!

रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या आक्रोश मोर्चात शेतकरी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान पावसाने हजेरी लावली तरी शेतकर्‍यांनी मैदान सोडले नाही, भरपावसात तुपकरांच्या भाषणाला शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!