पाचोड(प्रतिनिधी )देवदर्शन करून औरंगाबादकडे घरी परतत असणारी एक चारचाकी कार धूळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव जावळे ता.पैठण शिवारात बुधवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास लघूशंखासाठी थांबले असता अज्ञात चार जणांनी कारमध्ये असणाऱ्या कुंटुंबासह मारहाण करून त्यांच्याकडील ४० हजार रूपयांचा ऐंवज लुटल्याची घटना घडली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार औरंगाबाद येथील एक कुंटूब आपल्या चारचाकी कारने तुळजापूर येथील देवीचे दर्शन करून घरी परतत असताना आडगाव जावळे शिवारात रात्री एक ते दीडच्या दरम्यान आले असता कार चालकांने कार महामार्गाच्याकडे लावली असता कारमधील महीला व काही पुरूष लघूंशखेसाठी खाली उतरले त्यावेळी तिथे पाचोडच्या दिशेने अज्ञात चार ते पाच व्यक्ती तोंडाल रुमाल बांधून आले व कारमधील व्यक्तीना मारहाण केले आणि तात्काळ घटनास्थळावरून पायी पळ काढला.या घटनेनंतर कारमधील नागरिक हे घाबरल्याने त्यांनी त्या घटनास्थळवरुन तात्काळ आपले घर गाठले आणि त्यानंतर या घटनेची माहिती त्यांनी दुरव्धनीव्दारे पाचोड ठाण्यांचे सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे यांना दिली असता त्यांनी आपलो फौजफाटा घेऊन राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव जावळे शिवारात पोहोचले असता तिथे त्यांनी काही आढळून आले नाही.या घटने बाबत तक्रार नोंद करण्यासाठी अद्यापही कोणी आले नाही. मात्र पाचोड पोलिस ठाण्यांच्या हर्दीत ही घटना घडली असल्यामुळे पाचोड ठाण्यांचे सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे,
उपनिरीक्षक सुरेश माळी,बीट जमादार प्रशांत नांदवे,पोलिस नाईक पवन चव्हाण यांनी ताबडतोब तपासाची चक्रे फिरवली असून हे आरोपींना लवकरच पकडण्यात येथील असे पोलिसांनी सांगितलं आहे.