– सामाजिक कार्यासाठी संघर्ष केल्याचे ‘समाधान’ लाभले – सुनीता जाधव
बुलढाणा (संजय निकाळजे) – सामाजिक कार्यामध्ये उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या महिलांना पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्ताने ३१ मे रोजी येळगाव येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. याप्रसंगी बुलढाणा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सरिता पवार, एकात्मिक महिला बालविकास अधिकारी शिंदे, येळगाव ग्रामपंचायतचे सरपंच दादाराव लवकर, उपसरपंच प्रियाताई इंगळे यांच्याहस्ते उषा दादाराव देशमुख, वर्षा रत्नाकर झिणे, सुनिता समाधान जाधव यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने मान्यवरांनी सन्मानित केले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य कांताबाई साळोख, सविता कापसे, विमल साळोख, सचिन गडाख, अनिल कापसे, सुभाष खडके, सुभाष पाटील, सुनील जाधव, अंगणवाडी पर्यवेक्षिका विते मॅडम, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर तसेच गावातील महिला मंडळ व ग्रामपंचायत कर्मचारी सचिव सचिन जाधव तसेच गावातील नागरिक महिलांची उपस्थिती होती.
महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये ज्या महिलांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे, अशा महिलांना महाराष्ट्र सरकारकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार दिला जातो. ग्रामपंचायतस्तरीय समितीमार्फत गावातील महिलांची निवड करून पुरस्कार कर्तृत्ववान महिलांना त्यांच्या सामाजिक उपक्रमाची दखल घेऊन दिले जातात. सदर पुरस्कार उपरोक्त महिलांना ग्रामपंचायत येळगावतर्पेâ देऊन गौरवण्यात आले. महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या महिला ग्रामपंचायत हद्दीमधील रहिवासी असणे गरजेचे आहे, महिलांच्या समस्या व प्रश्न बाबत जाणीव व महिला संवर्धन संवेदनशीलता असणे, सामाजिक क्षेत्रात सहभाग असणे गरजेचे आहे. पुरस्कारसाठी पात्र असलेली महिला अत्याचारांमध्ये समाविष्ट नसावी, बालविवाह प्रतिबंध, हुंडा निर्मूलन, लिंग चिकित्सक प्रतिबंध, घरगुती हिंसा प्रतिबंध, महिला सक्षमीकरण, महिला स्वयंसहाय्यता बचत गट, आरोग्य साक्षरता,मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार, यासारख्या कार्यामध्ये पुढाकार घेतलेल्या महिलांना यामध्ये प्राधान्य देण्यात येते. सुनिता जाधव यांना सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे पत्रकार संजय निकाळजे, संगीता निकाळजे, हर्ष निकाळजे यांचेसह सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. आपण केलेल्या सामाजिक कार्याची ही एक पावती असून, केलेला संघर्ष त्यामुळे समाधान लाभले, अशी प्रतिक्रिया पुरस्कारप्राप्त सुनीता जाधव यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’कडे बोलताना व्यक्त केली आहे.
—————–