– टी-२० विश्वचषक स्पर्धा – अश्विनने शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकत भारताला दिला रोमहर्षक विजय
मेलबर्न – टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताने रोमहर्षक विजय साजरा करत, पाकिस्तानला धूळ चारली आहे. मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) मध्ये भारत व पाकिस्तानमध्ये झालेल्या अतितटीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला सहा बळी राखून हरवले आहे. रवीचंद्रन अश्विन याने शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकत भारताला शानदार विजय मिळवून दिला, आणि मेलबर्नच्या मैदानावर भारतीयांनी दिवाळी साजरी केली. या सामन्यात विराट कोहली विजयचा खरा शिल्पकार ठरला. विराट आणि हार्दिक पंड्याने हरत आलेला सामना विजयाच्या दिशेने खेचून आणला. भारतातदेखील दिवाळीच्या जल्लोषात या विजयाची भर पडली, आणि एकच जल्लोष साजरा झाला. या सामन्यात टॉस हरलेल्या पाकिस्तानने सुरुवातीला फलंदाजी करत, ८ बळी गमावून १५९ धावा केल्या होत्या. भारताकडून अर्शदीप सिंह व हार्दिक पांड्या यांनी शानदार गोलंदाजी करत प्रत्येकी तीन बळी घेतले. कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाची तरुण फळी विश्वचषकात उतरली आहे. मागील विश्वचषकात पाकिस्तानसोबत झालेल्या पराभवाचा यावेळी वचपा काढत भारतीय संघाने आज पाकिस्तानचे अक्षरशः दिवाळे वाजवले.
भारत- रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, आर अश्विन, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग.
पाकिस्तान- मोहम्मद रिझवान, बाबर आझम, शान मसूद, शादाब खान, हैदर अली, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, आसिफ अली, शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ.
The King has arrived! 🤩#BelieveInBlue & watch @imVkohli LIVE in action in the ICC Men's #T20WorldCup on Star Sports & Disney+Hotstar!#INDvPAK #GreatestRivalry #KingKohli pic.twitter.com/255rbjUkoP
— Star Sports (@StarSportsIndia) October 23, 2022

