-अधिकमास यात्रेदरम्यान गोदावरी नदीतील दुर्घटना; परिसरात शोककळा
बिबी (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथे सुरू असलेल्या अधिकमास यात्रेदरम्यान गोदावरी नदीत भाविकांनी भरलेली बोट उलटल्याने भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत लोणार तालुक्यातील बिबी येथील दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मात्र बिबी येथून यात्रेसाठी गेलेल्या कांताबाई ज्ञानोबा आंधळे (वय ६५) आणि प्रणिला शेषराव राठोड (वय ६०) यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून बिबी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अधिकमास यात्रेसाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असताना सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. बोटींची क्षमता, जीवरक्षक साधने आणि प्रशासनाच्या नियोजनाबाबत चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी भाविकांकडून होत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पुरुषोत्तमपुरी यात्रा परिसरात शोककळा पसरली असून मृत भाविकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.


