-अंधश्रद्धेवर विवेकाचा प्रहार; प्रबोधन सोहळ्यात परिवर्तनाचा संदेश
देऊळगाव माळी (प्रतिनिधी) : “महामानवांनी ज्या मूल्यांसाठी आयुष्य वेचले, ती मूल्ये केवळ इतिहासाच्या पानांवर न राहता ती आपल्या सुपीक मस्तकात पेरली गेली पाहिजेत. जोपर्यंत कष्टकरी आणि वंचितांची मुले शिक्षणाचे शस्त्र हाती घेऊन सत्तेच्या आणि ज्ञानाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचत नाहीत, तोपर्यंत खऱ्या अर्थाने क्रांती घडणार नाही,” असा सूर देऊळगाव माळी येथील प्रबोधन सोहळ्यात उमटला. ‘सेवानिवृत्त सेवा संघा’च्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि संत शिरोमणी गोरोबाकाका यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रास्ताविक शिवाजी जमधाडे यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रा. अनिल कलोरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी परिसरातील नागरिक, माता-भगिनी आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

