– जास्तीत जास्त शेतकर्यांनी खरिप पिकांचा विमा काढून घ्यावा – तहसीलदार नीलेश मडके
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – सध्या शासनाच्या प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत पीकविमा काढणे सुरू असून, जास्तीत जास्त शेतकर्यांनी आपल्या खरिप पिकांचा विमा काढून घ्यावा, असे आवाहन तहसीलदार नीलेश मडके यांनी केले आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या भित्तीपत्रक वाटपाचा शुभारंभ काल, दि.२१ जुलैरोजी तहसील कार्यालयात तहसीलदार नीलेश मडके यांच्याहस्ते झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. दरम्यान, पीकविमा काढण्यात शेतकर्यांची उदासिनता दिसून येत असून, आजपर्यंत तालुक्यातील जवळजवळ १८ हजार ८०० शेतकर्यांनी आपल्या खरिप पिकांचा विमा काढल्याची माहिती आहे.

