– ‘आयसीएसी रिसर्चर ऑफ द इयर २०२५ पुरस्कार’ जाहीर; तंझानिया येथे होणार पुरस्कार प्रदान सोहळा
– कोरडवाहू शेतकर्यांच्या कापूस उत्पादनात घडविली क्रांती; देशाच्या शेतीरक्षकाचा होणार सर्वोच्च सन्मान
साखरखेर्डा/बुलढाणा (अशोक इंगळे) – भारत सरकारच्या दि.२९ मे २०२५ रोजी सुरू झालेल्या विकसित कृषी संकल्प अभियान या मोहिमेसोबत सुसंगत, आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समिती (आयसीएसी)ने ‘आयसीएसी रिसर्चर ऑफ द इयर २०२५’ हा पुरस्कार भारताचा कापूस माणूस म्हणून ओळखल्या जाणार्या साखरखेर्डा येथील डॉ. सी. डी. उपाख्य चारूदत्त मायी यांना जाहीर केला आहे.
२००४ ते २०११ दरम्यान कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळाचे (एसआरबी) अध्यक्ष म्हणून डॉ. सी डी मायी यांनी देशातील कृषी शास्त्रज्ञ भरती प्रक्रियेत मूलगामी बदल केले. त्यांनी भारताच्या शासकीय यंत्रणेत पहिल्यांदाच ऑनलाइन भरती परीक्षेची सुरुवात केली आणि ५,००० हून अधिक शास्त्रज्ञांना तक्रारीशिवाय नियुक्त केले. डॉ. मायींनी एसआरबीला दरवाजा राखणारी संस्था न राहता कृषी नाविन्यतेची मशाल वाहणारी संस्था बनवली. निवृत्तीनंतरही डॉ. मायी दक्षिण आशिया जैवतंत्रज्ञान केंद्रामार्फत कापूस संशोधनात सक्रिय आहेत. त्यांनी मका, कापूस आणि मिरचीसारख्या पिकांवरील फॉल आर्मीवर्म, पिंक बोलवर्म, ब्लॅक थ्रिप्स सारख्या नव्या संकटांवर मोहीम हाती घेतली. गेल्या चार वर्षांत दरवर्षी १,००० एकरावर चाचण्या डीं कापसाला प्रतिरोधक झालेल्या पिंक बोल मात करण्यासाठी झइघों तंत्रज्ञानाची मोठ्या प्रमा लागवड त्यांनी सुरू केली. डॉ. मायी ?ग्रोव्हिजन फाउंडेशन आयोजित विदर्भातील वार्षिक मेगा कृषी प्रदर्शनातही सक्रिय सहभागी आहेत ज्याला ३-४ लाख शेतकरी उपस्थित असतात. तसेच ते महाराष्ट्र ज्ञान महामंडळ, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग आणि गोंडवाना विद्यापीठातील विज्ञान व तंत्रज्ञान स्रोत केंद्राचे मार्गदर्शक म्हणूनही काम करतात. डॉ. मायींना केवळ संशोधक म्हणून नव्हे तर दूरदर्शी नेते आणि कुशल विज्ञान प्रशासक म्हणून भारतीय शास्त्रज्ञ आणि शेतकरी समुदायाने सन्मानित करण्याची ही योग्य वेळ आहे, ज्यामुळे कृषी विज्ञान, तंत्रज्ञान आणि कापूस शेतीतील पिढ्यांना प्रेरणा मिळेल. विज्ञानाचं आयुष्य म्हणजे सेवेचं आयुष्य, असं डॉ. मायी म्हणतात. आणि नाविन्यतेची, संस्थांची आणि परिणामांची त्यांच्या आयुष्यातली ही समृद्ध फेलवणी पाहून भारताला एक महान कृषी धनी सापडला आहे, याची खात्री पटते.
भारताच्या कापूस क्रांतीचे शिल्पकार!
मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून डॉ. मायींनी इस्रायली उच्च-तंत्रज्ञानाचा वापर करून कापूस पिकावर मेगा प्रात्यक्षिकाचे प्रयोग केले तर आष्टा गावात पावसावर अवलंबून कमी खर्चाच्या पद्धतीचा प्रयोग केला. १९९० च्या अखेरीस या दोन्ही मॉडेलमुळे शेतकर्यांचे उत्पन्न लक्षणीय वाढले व गरीब भागांसाठी हे सोपे मॉडेल ठरले. यावरून १९९९ मध्ये नियोजन मंडळाने देखील ह्या प्रयोगाची दखल घेऊन त्याचा पुरस्कार केला. केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक म्हणून डॉ. मायींनी २००० ते २००३ दरम्यान ५५ सार्वजनिक चाचण्यांतर्गत हीं कापसाची जैवसुरक्षा, परिणामकारकता आणि कार्यक्षमता तपासली. त्यामुळे २००२ मध्ये भारतात कापसाला व्यावसायिक मान्यता मिळवण्यात त्यांचे नेतृत्व निर्णायक ठरले. कृषी आयुक्त म्हणून त्यांनी २००२ मध्ये सुरू झालेल्या कापूस तंत्रज्ञान मिशन अंतर्गत संपूर्ण भारतात या तंत्रज्ञानाचा प्रसार केला. त्यामुळे कीटकनाशकांचा वापर कमी होऊन, खर्चात घट आणि प्रति हेक्टर उत्पन्न ३०० किलोवरुन ५०० किलोपर्यंत वाढलं. दोन दशकांत देशातील कापूस उत्पादन तिप्पट झालं आणि भारत जागतिक कापूस उत्पादनात अग्रेसर ठरला.

