– साखरखेर्डासह सिंदखेडराजा तालुक्यातील ४० ग्रामपंचायती सरपंचपदासाठी महिलांसाठी राखीव
– तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या निवडणुका पहिल्यांदाच होणार थेट जनतेतून!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – सिंदखेडराजा तालुक्यातील ८० ग्रामपंचायतीचे आरक्षण दि. १६ एप्रिल रोजी तहसील कार्यालयात काढण्यात आले होते. तर महिलांसाठी आरक्षण सोडत आज, दि. २५ एप्रिलरोजी जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आली. त्यात ४० ग्रामपंचायतीवर महिलाराज येणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले. त्यात सिंदखेडराजा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या साखरखेर्डा ग्रामपंचायतीचा समावेश आहे. ही ग्रामपंचायतदेखील महिलांसाठी राखीव निघाली आहे.
सिंदखेडराजा तालुक्यातील ४० ग्राम पंचायतीची महिलांसाठी राखीव , अनुसूचित जाती करीता ९ , मागास प्रवर्ग साठी ११ तर सर्वसाधारण साठी २० ग्राम पंचायतीचे आरक्षण जाहीर
महिला आरक्षण सोडत आज जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आले असता अनुसूचित जाती महिलांसाठी करीता ९ , मागास प्रवर्ग महिलांसाठी ११ , तर सर्वसाधारण महिलांसाठी २० ग्राम पंचायतीचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे .
सिंदखेडराजा तालुक्यातील अनुसूचित जाती महिलांसाठी आडगाव राजा , रताळी , तांदुळवाडी , गोरेगाव , उमनगाव , नाईकनगर , जळगाव , दत्तापूर , धांदरवाडी ह्या ग्राम पंचायतीची महिलांसाठी राखीव आहेत . मागास प्रवर्ग महिलांसाठी २० पैकी ११ ग्रामपंचायत राखीव असून त्यात वर्दडी बु . , शिंदी , सावरगाव माळ , सवडद , नसिराबाद , पोफळशिवणी , सोनोशी , पिंपळगाव लेंडी , हिवरागडलिंग , डावरगाव , हनवतखेड ( महारखेड ) सर्वसाधारण ग्राम पंचायती ४० असून त्यापैकी २० ग्राम पंचायती महिलासांठी राखीव आहेत . त्यात उमरद , झोटींगा , धानोरा , हिवरखेडपुर्णा , वाघाळा , देवखेड , दरेगाव , पांग्रीउगले , पिंपरखेड बु . , किनगाव राजा , शेंदुर्जन , साखरखेर्डा , ढोरव्ही , भंडारी , आंबेवाडी , खामगाव , कुंभेफळ , पळसखेड चक्का , भोसा , सुलजगाव या ग्राम पंचायतीचा समावेश आहे . महिलांसाठी राखीव ग्राम पंचायतीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर सरपंच पदासाठी कोण ! याचा शोध घेणे सुरु झाले आहे.
तिसरी आघाडी निर्माण झाली तर तिहेरी लढत पाहायला मिळेल. शेवटी निवडणूक ही मतदारांच्या सकारात्मक निर्णयावर होणार आहे. साखरखेर्डा गावातील पाणी प्रश्न, पथदिवे, अंतर्गत रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन यासाठी ज्यांनी मागील काळात चांगले नियोजन केले असेल त्याला मतदान पसंती देणार आहे. केवळ जातीवर आधारित निवडणूक झाली तर काय चित्र राहिल हे सांगणे कठीण आहे.

