– सावरखेडा गोंधण येथील वायाळ कुटुंबाचा धक्कादायक प्रताप; शासनालाही लावला चुना?
जालना (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्ह्यातील लघु पाटबंधारे विभागाला सावरखेड गोंधण, ता. जाफ्राबाद येथील कुशिवर्ता वायाळ, स्वाती वायाळ व विष्णू वायाळ या कुटुंबाने लाखो रूपयांचा चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार दाखल झालेल्या तक्रारअर्जानंतर उघडकीस आला आहे. या कुटुंबाने सोनखेडा साठवण तलावात जमीन संपादनापोटी आलेल्या २५ टक्के रकमेतील श्रीमती अलका शालीकराम मिसाळ यांच्या हक्काची रक्कम परस्पर अंगठा टेकवून हडप केल्याची तक्रारच अलका मिसाळ यांनी कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग जालना यांच्याकडे केली आहे.
फसवणुकीचा हा प्रकार गंभीर असून, पाटबंधारे विभाग संबंधित वायाळ कुटुंबावर फौजदारी कारवाई करून पीडित अलका मिसाळ यांचे पैसे त्यांना परत देते, की नाही, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. तसेच, या फसवणूक प्रकरणात या कार्यालयातील एका कर्मचार्याचाही हात असल्याची चर्चा सुरू असून, याबाबत पीडित मिसाळ यांच्यावतीने लवकरच वरिष्ठ अधिकार्यांकडे तक्रार दाखल केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. एकीकडे, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे लाडकी बहीण योजना राबवत असताना, दुसरीकडे विधवा महिलेचीच फसवणूक होत असेल तर महिलांना लाडकी बहीण म्हणण्यात काय अर्थ आहे, अशी टीकाही सरकारविरूद्ध सुरू आहे.
———-
