– सप्टेंबर उजाडला तरी शेतकर्यांच्या खात्यावर पीकविमा जमा नाही
– यश हे आंदोलनातूनच मिळते हे स्पष्टच झालं – विनायक सरनाईक
– यश हे आंदोलनातूनच मिळते हे स्पष्टच झालं – विनायक सरनाईक
चिखली (तालुका प्रतिनिधी) – शेतकर्यांना पीकविमा मिळवून देण्यात अपयशी ठरलेले जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आ. संजय कुटे, आ. संजय गायकवाड, आ. डॉ. राजेंद्र शिंगणे, आ. डॉ. संजय रायमूलकर यांना अपयश आल्यानंतर याप्रश्नी शेतकरी नेत्यांनी या लोकप्रतिनिधींवर जोरदार टीकेची झोड उठवली आहे. शेतकर्यांना पीकविमा मिळवून देण्यात जिल्ह्यातील नेते अपयशी ठरले असून, सप्टेंबर उजाडला तरी शेतकर्यांच्या खात्यावर पीकविमा जमा नाही. शेतकरी नेते रविकांत तुपकर जेव्हा शेतकरी घेऊन मुंबईला जातात, तेव्हा ते पीकविमाच घेऊन येतात. या नेत्यांनी कृषिमंत्र्यांसोबत बैठक घेऊन फक्त पुढची तारीख आणली. शेतकर्यांना यश हे फक्त आंदोलनातूनच मिळते, अशा शब्दांत शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींवर टीकास्त्र डागले आहे.
——–
आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित व्हावे!
सद्या राज्यभर सोयाबीन-कापूस दरवाढ, शेतकर्यांची संपूर्ण कर्जमुक्ती व पीकविम्याचा मुद्दा ऐरणीवर आला असून, याप्रश्नी रविकांत तुपकर यांनी ४ सप्टेंबरपासून सिंदखेडराजा येथे अन्नत्याग आंदोलन सुरुवात करणार असल्याची घोषणा केली आहे व राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. हे आंदोलन जात धर्म, पक्ष संघटना विरहित होणार असून, या आंदोलनात पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन विनायक सरनाईक यांनी केले आहे.
पीकविम्याची फुटकी कवडीही मिळाली नाही; जिल्ह्यातील आमदारांच्या घोषणा हवेतली तलवारबाजी ठरल्या!

