आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : ज्यांची सर्व सामान्य जनता, शेतकरी आतुरतेने वाट पाहत होता तो पाऊस अखेर सुरु झाला असून आळंदी पंचक्रोशीत संततधार पाऊस असल्याने रहदारीला तसेच अनेक ठिकाणी खड्यात, साईड पाट्या खराब असल्याने रस्त्याचे दुतर्फ़ा तसेच खराब रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचून रहदारीला गैरसोयीचे झाले.
आळंदी येथील मरकळ रस्ता, वडगाव रस्त्याचे कडेने पावसाळी गटारात पाणी जात नसल्याने रस्त्यावरून पाणी वाहत राहिले. पावसाळी गटर्स कडे पाणी कसे जाईल याचे नियोजन करण्याची मागणी दक्षता सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष किरण नरके यांनी केली. आळंदी नगरपरिषदेचे आरोग्य विभागातील कर्मचारी पाण्याला वाट करून देताना दमझाक झाल्याचे दिसत होते. पावसाळ्या पूर्वीची कामे तात्काळ करण्याची मागणी यातून पुढे आली आहे.

