बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – अवकाळी पावसामुळे एकीकडे शेतकरी उध्वस्त होत असून, शासन मात्र शेतकर्यांच्या प्रश्नांबाबत गंभीर नाही, असा थेट आरोप विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. शासन मदतीच्या निकषाचे केवळ कागदी घोड़े नाचवत आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी शिवसेनेचे (ठाकरे) संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेड़ेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, विधानसभा संघटक गजानन धांड़े, तालुका प्रमुख रवि महाले, शहर प्रमुख विजय बोदड़े, विजय इंगळे, सुरज बेलोकार, प्रविण वाघ, ड़ॉ. घ्यार, ज्योती तारापुरे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
————–

