– नुकसान भरपाईपोटी बाधित शेतकर्यांना १०८२.०९ लाख अपेक्षित
बुलढाणा (प्रशांत खंडारे) – शेती हा व्यवसाय पूर्वीपासूनच जोखीमयुक्त आहे. परंतु, अलिकडच्या हवामान बदलाच्या काळात ही जोखीम फारच वाढलेली आहे. शेतीचे योग्य नियोजन केले तरी वाढत्या नैसर्गिक आपत्तींनी उत्पादन हाती लागेल की नाही, याची काहीही शाश्वती मिळत नाही. १५ ते २० मार्च दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात तब्बल ७,११५ शेतकर्यांचे हिरवे स्वप्न करपले आहे. जिल्ह्यात ४१६८.४१ हे. क्षेत्र बाधित झाले असून, या बाधित शेतकर्यांना १०८२.०९ लाख रुपयांची रक्कम अपेक्षित असल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने शासन दरबारी पाठविला आहे.
या शेतकर्यांना ९६७.९३ एवढी रक्कम अपेक्षित आहे. जिल्ह्यामध्ये ६६१ शेतकर्यांचे ४२८.११ जिरायत पिकाखालील क्षेत्र बाधित झाले. या शेतकर्यांना ५८.२२ एवढी रक्कम अपेक्षित आहे. असा अहवाल जिल्हा कृषी विभागाने शासन दरबारी पाठविला आहे. राज्यातील शासकीय निम शासकीय कर्मचार्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. दरम्यान अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकर्यांना झोडपून काढले. शेतातील उभे पीक उध्वस्त झाले. या पिकांचा पंचनामा देखील होत नव्हता. जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिल्यावरून कृषी विभाग कामाला लागला. असे असले तरी आता शेतकर्यांना नुकसान भरपाई कधी मिळेल हा प्रश्नच आहे.

