सोलापूर (संदीप येरवडे) – सोलापूर जिल्ह्यातील जवळपास २३२ गावांत जलयुक्त शिवार योजनेची कामे होणार आहेत. त्यासाठी गाव पातळीवर सरपंच हे अध्यक्ष असून, त्यांच्याशी चर्चा करून प्रत्यक्ष कामाची सुरुवात एप्रिल महिन्यामध्ये करण्यात येणार आहे. या जलयुक्त शिवार योजनेमुळे जिल्ह्यातील पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे.
या गावभेटी दौर्यामध्ये सरपंच यांना विश्वासात घेऊन गावातील पाण्याची स्थिती, पडणारा पाऊस, कोणती कामे जलयुक्त मधून झाली आहेत आणि कोणती आणखी करावी लागेल यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. विशेषत: त्या गावांमध्ये कोणत्या कामाची गरज आहे हे ओळखून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी जिल्हा पातळीवर आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्या आराखड्यानुसार कामाला सुरुवात होणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात मागील काही वर्षांपूर्वी जलयुक्त शिवार योजनेचे कामे चांगली झाले होते. आता पुन्हा शासनाने सोलापूर जिल्ह्यातील २३२ गावाचा समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे गाव भेट दौरा आणि त्यानंतर एप्रिलच्या दरम्यान या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होण्याची शक्यता आहे.
– पंडित भोसले, जि. प. जलसंधारण अधिकारी

